चिपळूण तालुका मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
चिपळूण (ओंकार रेळेकर)मराठा महाकुटुंब मराठा समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी आहे.मराठा समाज महाकुटुंबातर्फे विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक योजना सर्वसामान्य मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन मराठा समाजाचे नेते कोकणातील प्रतिथयश उद्योजक प्रकाश देशमुख यांनी केले. चिपळूण तालुका मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील अभ्यासू,कष्टाळू आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा रविवारी चिपळूण मधील अतिथी सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.मराठा समाजातील महा कुटुंब म्हणून आपले हे नाते पुढील काळात असेच कायम टिकून राहील भविष्यात मुलांना समाजाच्या वतीने सर्वच क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्यासाठी मदत केली जाईल आर्थिक सामाजिक दृष्ट्या समाज आपल्या तरुणांच्या पाठीशी सदैव उभा राहील असे सांगून मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता भविष्यात एक स्वतंत्र अशी वेबसाईट तयार करून मराठा समाजातील उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तर्फे शिक्षणात अत्यंत गरजवंत व गरीब विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा आजपर्यंत इतर कार्यक्रमात सत्कार झाला असेल परंतु आज झालेला सन्मान हा आपल्याच घरातील आपल्या पाठीशी असलेली कौतुकाची थाप आहे. या पुढील काळात विद्यार्थ्यांचा घेतला जाणारा सत्कार यापेक्षाही भव्य दिव्य असा केला जाईल मराठा महा कुटुंब तर्फे समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत विविध शासकीय योजना व शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले जातील अशी माहिती मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते कोकणातील उद्योजक प्रकाश देशमुख यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना दिली



समाजाने घालून दिलेल्या संस्कृतीमुळेच विद्यार्थी घडतो.शिक्षणात यश मिळवत असताना मुलानी आपल्या आई वडिलांचे कष्ट,उपकार कधीच विसरू नये शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे स्मरण राहिले पाहिजे.मराठा समाज बांधवांची देशाच्या संरक्षणात देखिल
अत्यंत महत्त्वाची कामगिरी राहिली आहे.देशाच्या आर्मीमध्ये देखील मराठा समाज सैनिकाचे नाव आवर्जून घेतले जाते.आपला देश प्रगती पथावर येण्यासाठी विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका आहे.मुलांनी उच्च पदावर
शिक्षण घेऊन देशाचे प्रतिनिधित्व करावे असे आवाहन चिपळूणचे माजी आ.सदानंद चव्हाण यांनी केले.
प्रमुख मान्यवर म्हणून बोलताना या वेळी शिवसेना माजी आमदार,उपनेते सदानंद चव्हाण आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.दीप प्रज्वलन करून ‘जय शिवराय’च्या घोषणांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यार्थ्यांनी पुढील काळात जे क्षेत्र निवडाल त्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे काम करून मराठा समाजाचे नाव उंचवावे समाज नेहमीच आपल्या पाठीशी दिशादर्शक म्हणून उभा राहिला आहे.एखादे शैक्षणिक कार्य करताना ते उत्तम कसे होईल यासाठी प्रयत्न करावा शिक्षणात धडपड करा यश नक्की चालून येईल तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे जिद्द,चिकाटी आणि आलेल्या प्रत्येक संधीला न्याय देण्याचा प्रयत्न करा तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊन खूप उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणातून उत्तम करिअर करून शिक्षणासोबतच देशाला दिशा देण्याचे कार्य करावे असे अर्जुन पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील नामवंत कबड्डीपटू अशोक शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आवाहन केले. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने आपले करिअर घडवा यश तुमच्या पायाशी नक्की येईल असे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.मराठा समाजातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम मोरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या मनोगतातून सांगितली.जि.पचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार राजमाने,अशोक शिंदे,सौ.स्वप्ना यादव,यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.भक्ती पवार, यांनी आपले शिक्षणातील अनुभव आणि मनोगत व्यक्त केले.शिवसेना उपनेते,माजी आ.सदानंद चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार विजेते,अशोक शिंदे जि.पचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष बळीराम मोरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव,सौ.स्वप्ना यादव,उद्योजक सतीश चव्हाण,माजी सभापती धनश्री शिंदे,उद्योजक प्रकाश देशमुख,भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे,शिवसेना माजी जिल्हा प्रमुख सचिन कदम,रामदास राणे,प्रभाकर मोरे,माजी जि.प सदस्य ऐश्वर्या घोसाळकर,डॉ.यतीन जाधव,दिलीप देसाई,सौ.सीमा चाळके,सतीश कदम,अनंत मोरे,
उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार राजमाने,
लक्ष्मण शिंदे,प्रज्ञा मोरे,आशा गायकवाड,कपिल शिर्के,शिवसेना संपर्क प्रमुख अशोक नलावडे,
प्रसाद शिर्के,अँड.स्मिता कदम आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मराठा समाजातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या एकूण चारशे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या तसेच आपल्या उद्योग व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे वीस विशेष अतिथींचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार कदम यांनी केले. या कार्यक्रमात शिक्षण,क्रीडा, कला, स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंडळाच्या शैक्षणिक योजना आणि विद्यार्थ्यांसाठी लाभदायक योजनांची परिपूर्ण माहिती देऊन उद्योग व स्वरोजगारासाठी मिळू शकणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली.प्रसाद शिर्के,रमण डांगे
कपिल शिर्के ,प्रभाकर मोरे
सचिन खापणे,शशिकांत चव्हाण
दीपक जाधव,तानाजी इलके
सचिन कदम,संजय घाडगे
मंदार कदम,परिमल भोसले
डॉ.अरुण पाटील
संदीप मोरे,सार्थक मोरे
अक्षय शिंदे,बाळू शिंदे
महेश शिंदे,अमित पवार
साहिल शिर्के,ऐश्वर्या घोसाळकर
आशा गायकवाड,सीमा चाळके
नीलिमा जगताप,प्रज्ञा मोरे,सुकन्या चव्हाण,पूर्वा तांदळे ,राणी महाडिक
पूर्वा आयरे,भाग्यश्री चोरगे
ज्योती जाधव,संध्या घाडगे
अपूर्वा मोरे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
फोटो : उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत भारत देशाबाहेर आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवणारे नेपाळ व श्रीलंका देशात प्रकाश इलेक्ट्रिकल्स व्यवसायाची पाळे मुळे रोवणारे मराठा उद्योजक प्रकाश देशमुख यांचा विशेष सत्कार करताना उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार राजमाने यांच्यासह मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)